Sunday, January 20, 2019

Are you ready to die?

Second surgical strike ,tight security everywhere,anti aircraft guns placed in mumbai was the headline one fine morning and every Indian was surprised and shocked at  the same time.Balakot  bombings was at headlines .Then one pilot was missing was the next news,Indian commander abhinandan missing was the  news,then we came to know that F16 was hunted by him.Pakistan army got him in POK, after drama of 60 hours he was released, then he was national hero,but soon all matter was politicised in every way that was possible. But to your kind notice our Indian army is the bravest army in world,we can finish Pakistan that is for sure,but at what cost, someone was saying we should have used nuclear bombs ,but are you ready for reply,is it so simple ? I will ask you three simple questions ,1- are you ready if Pakistan puts bomb over India? 2- are you ready if bomb is put over your city? 3- are you ready if you and family die in that nuclear attack ? If answer to any of these questions is yes then let me know.

Thursday, January 17, 2019

कोणी येतंय का रे या शाळेत

शाळा म्हट्लं की मला माझी प्राथमिक शाळा बुरकोनी व साई बाबा विद्यालय बुरकोनी आठवतं, त्या रम्य आठवणी, ते बालपण, माझी शाळा मराठी माध्यम शाळा होती, मी दहावी पर्यंत तिथे शिकलो, खरं म्हटलं तर या शाळेने मला घडवलं, नंतर डॉक्टर झाल्यानंतर दोन तीन वेळा मला तिथे जायला मिळालं, पण काल परवाच माझा एक मित्र मला सांगत होता की दोन्ही शाळा बंद होण्यावर आल्यात,मला धक्काच बसला ,कारणही तसंच आहे आता कोणी आपल्या मुलाला मराठी शाळेत टाकायला तयार नाही, तालुक्याला जायला चांगला रस्ता झालयं तर सगळे जण आपापल्या मुलांना तालुक्याच्या मराठी शाळेत टाकतेय, सगळे जण म्हणतात की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला तर समोर मुलांची अडचण होणार नाही, पण ज्या मुलाची मातृभाषाचं पक्की नाही,त्याचं समोर काय होणार, मी मराठी शाळेतून आलो म्हणून तुम्ही पण तिथेच जा असं मी म्हणतं नाही आहे, पण मराठी भाषेतून शिकलात म्हणून तुम्ही समोर जाणार नाहीत,असा जो समज आहे तो मला चुकीचा वाटतो पण यामुळे सगळ्या महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत, अमृतालाही पैजै जिंकू अशी ही माझी मराठी आहे.

Friday, January 11, 2019

भावा विषय खोल आहे

राहुल माझा चांगला मित्र आहे,एका खूप मोठ्या आयटी कंपनीत तो मोठ्या पदावर आहे,त्याच्या वयोगटात भरपूर कमावणारा तो आहे,त्याचा आयुष्य बघून त्याच्या सोबतच्या सर्वाना त्याचा अभिमान वाटावा असा तो आहे,मलाही त्याचा अभिमान आहे,एखाद्या रेसिडेंट डॉक्टर सारखा तो त्याच्या कंपनीत काम करतो,आठवड्याला शंभर तास वगैरे असा काम करतो,सकाळी सात वाजता तो घरून निघतो आणि रात्री उशीरा येतो ,कधी दहा कधी बारा वाजता तो घरी येतो. घरी आल्यावर पण याचं वर्क फ्रॉम होम वगैरे असतंच. विदेशी कंपन्या व त्याचे ग्राहक यांच्या सेवेसाठी याला आपल्या झोपेचं खोबर करावं लागतं.

कुठलाच व्यक्ती हे जास्त वेळ करू शकत नाही, केव्हा ना केव्हा खासगी आयुष्य त्याने बाधित होणारच,राहुलचं ही तसंच काहीसं झालं, नवीन झालेल्या लग्नातलं नवंपन केव्हा गेलं हे त्याला पन कळलं नाही, त्याचा नुसता रोबोट झालाय ,सकाळी लवकर उठून पैश्याच्या नावाखाली आपलं आयुष्य खर्ची घालायचं कोण्या तरी विदेशी कंपनी साठी जिथे त्यानं नोकरी सोडली तर त्याच्या जागी दुसऱ्याला घ्यायला कंपनी ला 24 तास पण लागणार नाही, अश्या या शर्यतीत राहुल पळतोच आहे,जीव सुटेसो धावतोय,पण जगणं जगायचं तो विसारलाय,दोन वर्ष झाली राहुलच्या नोकरीला ,फक्त दोन वर्षात त्यांचं जीवन पूर्णपणे बदललंय, काय होतास तू आणि काय झालास तू असं झालयं,खरोखर हे जगणे राहुलला हवं होतं का ?नाही हे तर दुश्मनाला पण नको, मग राहुलने काय करायला हवं सांगा मला,तुमच्यात पण खूप असे राहुल असतील त्यांनी काय केलयं ,मला सांगा आपली मतं कारण हा विषयचं खोल आहे.

Saturday, January 5, 2019

फुलपाखरू

मन हे खरचं अल्लड असतं, न उमगेलेलं एक कोडे असतं, नवीन वर्षात काय करावं आणि काय नाही असं वाटतंय,कधी वाटतं खूप दिवसांची राहिलेली कादंबरी लिहावी, कधी वाटतं गिटार शिकावी, आणि हो ते स्कुबा डायविंग वगैरें राहिले आहेच की! बायको कधी कधी स्वित्झर्लंडला जाऊ का आपण वैगरे म्हणतेच आहे.खरचं नवीन वर्षात एवढं काही करायचं आहे,कोणी विचारतं की नवीन वर्षात काही संकल्प केला का? तर मुळात संकल्प हे नवीन वर्षातच केले पाहिजे हे मला पटत नाही. जेव्हा हवं तेव्हा आपण ते केलं पाहिजे या विचाराचा मी आहे,नवीन वर्षात फक्त एक नक्की करायचं आहे,हा ब्लॉग अखंड चालू ठेवायचा आहे,कारण या मनाच्या फुलपाखराला उडायचा आहे.